'रहस्य' हवी असणारी कोणतीही गोष्ट मिळवून देत: सुख , आरोग्य , आणि धनसंपती
|
|
'रहस्य' म्हणजे हाच आकर्षणाचा नियम. तुमच्या जीवनात जे जे येतं, घडत असते ते ते तुम्हीच आकर्षित करीत असता. आणि ते तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमाव्दारे आकर्षित करता. ज्याचा तुम्ही सतत विचार करता त्या मानास प्रतिमा . जे जे तुमच्या मनात चालेललं असतं ते ते तुम्ही आकर्षित करता. "तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व येतं. तेमचा प्रत्येक विचार एक वस्तू - एक शक्ती आहे "
|
-तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता.आपण जी गोष्ट मिळविण्याची ठरवितो , ज्या गोष्टाची स्वत:साठी निवळ करतो , ती मिळवू शकतो. ती गोष्ट किती 'मोठी' आहे याचा मी विचार हि करीत नाही कारण यामुळे काहीच फरक पडत नाही. तुम्हाला तुमचं निवासस्थान कसं असावसं वाटतं? तुम्हाला करोडपती बनण्याची इच्छा आहे का ? तुम्हाला कोणत्या प्रकारचा - कसा उधोग धंदा हवा आहे ? तुम्हाला आणखी - अधिक यशस्वी व्हायचय ? तुम्हाला खरोखर आणि नेमके काय हवंय ? भूतकाळातील ज्या प्रमुख व्यक्ती हे'रहस्य' जाणत होत्या त्यांना हि शक्ती केवळ स्वतःपाशीच राखून ठेवायची होती. इतरांना कळू द्याची नव्हती. त्यांनी सर्व सामान्य लोकांना या बाबतीत अंधारात ठेवले. अज्ञान ठेवले. सर्व सामान्य लोक दिवस भर काम करणे संध्याकाळी घरी परतणे याच चक्रात फिरत असणे. मन:शक्ती उपयोग ते करत नव्हते. कारण या शक्ती चं रहस्य काही थोड्या लोकांपुरतंच सीमित राहिलं. इतिहास या गोष्टींचा साक्षी आहे कि अनेकाच्या मनात या रहस्याच ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जागृत झाली आणि जाणकार तर इतरांपर्यंत हे ज्ञान पोहोचविण्याच सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न-या ज्ञान चा प्रसार करण्याची कार्यही केलं......... मी अनेकांच्या जीवनात कित्येक चमत्कार होताना पहिले आहेत. वित्तीय चमत्कार,शारीरिक उपचाराबाबत चे चमत्कार, मानसोपचारांचा क्षेत्रातील चमत्कार , नातेसंबंध सुधारण्याविषयीचे चमत्कार.
|